या ब्लॉगवर प्रकाशित केलेल्या सर्व रचना स्वरचित असून, रचनांच्या मुद्रणाचे वा अन्य कोणत्याही प्रकारे प्रकाशनाचे सर्वाधिकार मी स्वत:कडे राखून ठेवलेले आहेत. योग्य परवानगिशिवाय कुणीही या कवितांचा कुठेही वापर करू नये ही विनंती.

© सुरेश शिरोडकर.



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, २८ जुलै, २००८

वजाबाकी

+ _ + _ + _ + + _ + _ + _ + __ + _ + + _ + _ + _ + _ + _ +
+ _ + _
+ _ + _ + _ + _ + _ +
_ + _ + _ + _ + _ + _ + _ + _
+ _ + _ + _ + _ + _ + _ + _ +
_ + _ + _ + _ + _ + _ + _ + _
+ _ + _ + _ + _ + _ + _ + _ +
_ + _ + _ + _ + _ + _ + _ + _

= 0000


तू जीवनात आलीस अनं
बेरीज करून मिळवत बसलो
या मिळवणीच्या गणितात
कधी वजाबाकी नाही शिकलो

तू जीवनातून वजा होताना
वजावट शिकवुन गेलीस
फसवी माझी मिळकत
शुन्य शुन्य करून गेलीस

तू जीवनातून वजा होताना
नयनी अश्रु साठवुन राहिली
बेरीज-वजाबाकिच्या गणितात
तेवढीच माझी बाकी राहिली

चुकलेले हे गणित माझे
पुन्हा सोडवत नाही बसायचं
कोर्‍या पाटिकडे बघत आता
तुझ्याशिवाय जगत रहायचं

सुरेश शिरोडकर >>>
२६ जुलै २००८

गुरुवार, १० जुलै, २००८

स्वप्नभंग

.मध्यान्ह रात्र होती
मी स्वप्नी दंग होती
अशी झोप का उडाली
मम स्वप्ने भंग झाली

तरु उंच नभी उभे
तरुशिखरी घरटे माझे
तुफान कसे आले
तरु उन्मळुनी गेले
.पीक पोटरीत होते
वार्‍याशी डुलत होते
टोळधाड कुठुनी आली
पीक घळघळुनी गेली '

कदली उभी लवून
कंठी लोंगर लेवून
वात उंडरुनी आला
सोट कंबरेत दुडाला '

घर चंद्रमौळी माझे
नाही छत्र मज दुजे
वातचक्र कसे आले
छत अंबरी उडाले

अशी चांदरात होती
तार्‍यांची आस होती
काजवे कुठुनी आले
मन काळवंडून गेले '
.
किनार्‍यास माझी नांव
पल्याड माझे गांव
वादळ कुठुनी आले
तारु सागरी बुडाले
.
सुरेश >>>
जून २६, २००८
.
जून २००८ ह्या दिवशी S.S. C. चा निकाल होता आणि त्याच दिवशी मी ही कविता लिहिली होती.

बुधवार, ९ जुलै, २००८

माझी ऑरकुट मैत्रिण

अशी माझी एखादी ऑरकुट मैत्रिण असावी
जीचे दर दिवशी दहा तरी ....
forwarded इमेल्स यावेत
आणि दुबळ्या माझ्या ईनबाँक्समध्ये junk मेल्स भरगच्च भरावेत

अशी माझी एखादी ऑरकुट मैत्रिण असावी
जीचे दिवसाला दहा तरी
फक्त हाय... how r u.... असे msg. यावेत
आणि सकाळी क्षेमकुशल ऐकूनही पुन्हा दुपारी how r u.. असेच विचारावे

अशी माझी एखादी ऑरकुट मैत्रिण असावी
जीने दरदिवशी तीच्या आणि मित्रांच्याही ....
community जाँइन करायची विनंती करावी
आणि कधीतरी माझीच ommunity मला जाँइन करायची request पाठवावी

अशी माझी एखादी ऑरकुट मैत्रिण असावी
जी दिवसातून दहा वेळा तरी....
ऑरकुटींगसाठी online असावी
आणि काल बोललेल्या संभाषणाची आज पुन्हा तीच टेप लावावी

असा माझा एखादा ऑरकुट कवीमित्र असावा
ज्याचे दिवसातुन दोन तरी ....
स्वतःच्या कवितेचे links यावेत
आणि त्याच्या दोन कविता वाचल्यावर एकतरी शेर सुचावा


- सुरेश
October, २००८

दयाघना


,
ये रे ये रे पावसा.... गाणं गायलं नाही
तुला देतो पैसा.... आमिष दावलं नाही
कधी नाही परी यंदा मृगापुर्वीच आलास
आला आला उच्चारता तोंड घेऊन गेलास

तप्त लाल धरणीला स्नान घालून गेलास...
हिरवी साडी नेसण्यापुर्वीच पिंगट का केलास?
वृक्ष-वल्ली झाडांना पाणी पाजून जगवलीस...
त्यांनाच आडवी पाडून त्यांची हाडे का मोडलीस?
चार दिवस चोहीकडे थुई थुई नाचलास...
नदी-नाले भरण्यापुर्वीच दडी मारून बसलास
भार-नियमनच्या राज्यात वीजा पाडून गेलास...
गरीबाच्या छप्पराचा कोळसा का केलास?

गावो-गांवी शेतकरी तुझाच धावा करेल...
यज्ञात बळी देईल, होम-हवन करेल
चातकापरी तोंड उघडून नभाकडे बघेल...
तू नाही द्रवलास तर आपलीच अश्रु गिळेल
गुरं-ढोर विकून जमीनी गहाण ठेवेल...
सारेच यत्न हरले की आत्महत्या करेल

सुका दुष्काळ जाहिर करून नेता दौरा करेल
हताश होउन बळीराजा भिका मागत फिरेल
घनांधच असतील कर्जमाफिला पात्र
पावसाविनाच पार पडेल पावसाळी सत्र

आम्हावरी कर अनुकंपा.. बा दयाघना
रुसून असा बसू नकोस.. बरस रे घना
तुझ्याबिना जगणार कसे.. सांग रे वरुणा
अंत आता पाहू नकोस.. बरस-बरस रे घना

सुरेश >>>
२१ जून २००८

कर झिला घराची आठवण


कोकणातून शहरात आलेल्या प्रत्येक चाकरमन्याची कर्मभूमि जरी मुंबई असली तरी कोकण ही त्याची जन्मभूमि जननी आहे. त्या जननीची निदान आठवण तरी काढणे हे प्रत्येक चाकरमन्याचे कर्तव्य आहे.

अरे शहरी धन्या चाकरमन्या...
तूका कोंकण साद घालता
वरसातून एकदातरी भेटिक बोलयता
अरे पुता भेटाक बलयता

शहरात गेलंय चाकरी केलयं...
बघ कसो कनो वाकयलंय
पैश्यामागे लागान कित्यां घराक इसारलंय
अरे पोरा घरार पाणी सोडलंय

मातयेत लोळान मोठो झालंय...
आनी मातीक इसारलंय
मातीच्याच छातीवर बंगले उभारलंय
अरे लेका जमीन खावनं बसलंय

हुतुतू खेळलंय खोखो खेळलंय...
तेव्हा कसा मैदान गाजयलंय
फळकुटाच्या खेळापायी खेळाची वाट लायलंय
अरे गड्या खेळार ओस मारलंय

हापूस चोकून मिटके मारलंय...
तेव्हा बरो आंब्यार ताव मारलंय
तोरा चावान पोरां आता त्वांड आमट करतत
अरे बाबा तोंडार म्हावं मारलंय

शिकान-शिकान पदव्या घेतलंय...
आनी मोठो बॅरीस्टर झालंय
कोंन्व्हेंटमध्ये पोरांक शिकवून मराठी बिगड़लंय
अरे सायबा मराठीची वाट लायलंय

येक बरा केलंय रेल्वे हेलंय...
थोडोफार परवास सुखावलो
भैयाक वसरी दिलंय तूझो भावबंद दुखावलो
अरे भावा भावाशीक दुखयलंय

अरे इस्टेट् कमयं पैसो कमयं...
कर झिला घराची आठवण
वरसाक़ एकदा आयेक एक रुपयो पाठवं
कर झिला आवशीची आठवण

सुरेश >>> 
29.5.2008