.मध्यान्ह रात्र होती
मी स्वप्नी दंग होती
अशी झोप का उडाली
मम स्वप्ने भंग झाली
तरु उंच नभी उभे
तरुशिखरी घरटे माझे
तुफान कसे आले
तरु उन्मळुनी गेले
.पीक पोटरीत होते
वार्याशी डुलत होते
मी स्वप्नी दंग होती
अशी झोप का उडाली
मम स्वप्ने भंग झाली
तरु उंच नभी उभे
तरुशिखरी घरटे माझे
तुफान कसे आले
तरु उन्मळुनी गेले
.पीक पोटरीत होते
वार्याशी डुलत होते
टोळधाड कुठुनी आली
पीक घळघळुनी गेली '
कदली उभी लवून
कंठी लोंगर लेवून
वात उंडरुनी आला
सोट कंबरेत दुडाला '
घर चंद्रमौळी माझे
नाही छत्र मज दुजे
वातचक्र कसे आले
छत अंबरी उडाले
अशी चांदरात होती
पीक घळघळुनी गेली '
कदली उभी लवून
कंठी लोंगर लेवून
वात उंडरुनी आला
सोट कंबरेत दुडाला '
घर चंद्रमौळी माझे
नाही छत्र मज दुजे
वातचक्र कसे आले
छत अंबरी उडाले
अशी चांदरात होती
तार्यांची आस होती
काजवे कुठुनी आले
मन काळवंडून गेले '
.
किनार्यास माझी नांव
पल्याड माझे गांव
वादळ कुठुनी आले
तारु सागरी बुडाले
.
सुरेश >>>
जून २६, २००८
.
जून २००८ ह्या दिवशी S.S. C. चा निकाल होता आणि त्याच दिवशी मी ही कविता लिहिली होती.
khup chhan lihtos re baba.... Awadla...
उत्तर द्याहटवा